माननीय राज साहेब,
आपल्या मराठी मुलुखातील रयतेतील माझ्यासारख्या सामान्य माणसाचा आपल्या चरणी साष्टांग दंडवत !
आपल्या मराठी मुलुखातील रयतेतील माझ्यासारख्या सामान्य माणसाचा आपल्या चरणी साष्टांग दंडवत !
आपल्यासारख्या व्यक्तीस पत्र लिहावे असे नेहमी वाटत असे. पण योग येत नव्हता. तसेच कामाच्या व्यापामुळे वेळेचा प्रश्न होता. आज मात्र ठरवले की पत्र प्रपंच करायचाच.
माझ्याकडे आपणास सांगण्यासारखे बरेच विषय आहेत. पण सध्या मला जो महत्वाचा विषय वाटतो त्याबद्दल सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी आपल्या एका शिलेदाराने विक्रोळी-कान्जुरमध्ये एक आंदोलन केले होते. आपल्यास ज्ञात असेल. साधारण 1-2 वर्षापूर्वी विक्रोळी-कांजूर येथील होणाऱ्या डम्पिंग ग्राउंड विरोधात आंदोलन केले होते. आपल्याच आशीर्वादाने ते आंदोलन पार पडले होते. तेव्हा आपले शिलेदार नगरसेवक होते. आंदोलनाच्या पश्चात ते आमदार झाले. वाटले की आता डम्पिंग ग्राउंडपासून कायमची सुटका होणार. पण सुटका तर नाहीच पण चांगलाच विळखा पडला आहे. राज-रोजपणे डम्पिंग ग्राउंड सुरु झाले आहे तेही कुठल्याही उद्घाटनाशिवाय? जनतेची इतर कामे कधी इतकी लवकर होत नाहीत.
डम्पिंग ग्राउंड सुरु झाले याची माझ्याकडे कागदोपत्री माहिती नाही. कदाचित ते कागदावर सुरु नसेलही, पण मी माझ्या डोळ्यांनी पहिले त्यावर माझा विश्वास आहे. माझ्या घरातूनही कचऱ्याची टेकडी दिसते आहे. कचऱ्याच्या गाड्या रोज जाताना दिसतात. रोज कचऱ्याचा गंध परिसरात दरवळतो. डास ही मित्राप्रमाणे घरात येतात. आज दिसणारी टेकडी पर्वत कधी बनेल हे कळणार नाही. आपल्या शिलेदाराला सरकारी भाषा समजत असावी कारण कागदावर डम्पिंग ग्राउंड नसेल म्हणूनच ते शांत आहेत. त्यांचा डोळ्यावर विश्वास दिसत नाही. किंवा मंत्रालयात ते खूप काम करत असावेत त्यामुळे त्यांना इकडे बघायला वेळ नाही.
मला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण आपण 'मला एकदा संधी द्या मग बघा काय करतो ते' असे सांगता. आपणांस संधी मिळाली आहे. पहिल्याच प्रयत्नात 12 आमदार ही काही लहान संधी नाही. करायचे तर एक आमदारही बरेच करतो पण करायची इच्छा असावी लागते. आपल्याकडे 12 आहेत. खूप अपेक्षा होत्या आपल्याकडून पण भरवश्याच्या म्हशीला टोणगा !
चूक तुमची नव्हे, चूक आमची आहे कारण आम्ही सामान्य माणसे मनसे विश्वास टाकतात आणि राजकारणी तो दिलसे तोडतात. आपणांस मी राजकारणी समजले नव्हते, आमच्यातीलच मानले होते. हा माणूस आपल्या मनातील भाषा बोलतो असे वाटले, अजूनही वाटते म्हणूनच हा पत्र प्रपंच. पण आपले शिलेदार मात्र वेगळ्याच विश्वात आहेत. त्याचा परिणाम आपण महापालिका निवडणुकांच्यावेळी पाहिलात.
माझ्या मागणीचा विचार करून त्यावर कार्यवाही व्हावी ही विनंती.
कळावे.
चुकभूलीची माफी असावी.
आपला,
एक सामान्य माणूस.
मला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण आपण 'मला एकदा संधी द्या मग बघा काय करतो ते' असे सांगता. आपणांस संधी मिळाली आहे. पहिल्याच प्रयत्नात 12 आमदार ही काही लहान संधी नाही. करायचे तर एक आमदारही बरेच करतो पण करायची इच्छा असावी लागते. आपल्याकडे 12 आहेत. खूप अपेक्षा होत्या आपल्याकडून पण भरवश्याच्या म्हशीला टोणगा !
चूक तुमची नव्हे, चूक आमची आहे कारण आम्ही सामान्य माणसे मनसे विश्वास टाकतात आणि राजकारणी तो दिलसे तोडतात. आपणांस मी राजकारणी समजले नव्हते, आमच्यातीलच मानले होते. हा माणूस आपल्या मनातील भाषा बोलतो असे वाटले, अजूनही वाटते म्हणूनच हा पत्र प्रपंच. पण आपले शिलेदार मात्र वेगळ्याच विश्वात आहेत. त्याचा परिणाम आपण महापालिका निवडणुकांच्यावेळी पाहिलात.
माझ्या मागणीचा विचार करून त्यावर कार्यवाही व्हावी ही विनंती.
कळावे.
चुकभूलीची माफी असावी.
आपला,
एक सामान्य माणूस.










