सगेसोयरे अश्रृ ढाळतील काही काळ
मित्रही येतील सांत्वनासाठी
भडाग्नी दिल्यावर सर्वजण परतील
मी मात्र माझेच कलेवर जळताना पाहिल
आयुष्यभर शरीराला जाळत आलो
मेल्यावर फक्त राख झाली
जगताना नुसता धावत होतो
कशासाठी धावत होतो त्यास उत्तर नव्हतं
मरणानंतर माझ्याकडे वेळ आहे
एकप्रकारची शांती आहे
अगदी पिसासारखं हलकं वाटतयं
मी या जगात नसल्यावर मी मला भेटलो
by -- विनोद गोविंद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा