सुखामागे धावताना
कधी मी माझा विचारच केला नाही
फक्त मला सुख हवयं ह्या विचारात
कधी सोनेरी क्षण हरवले कळलेच नाही
मला सर्व काही मिळत गेलं
पण सुखाची अनुभूती कधी झाली नाही
कधी मला सुख मिळेल
हाच सदा विचार केला
आयुष्याअखेरी मला सुखाचं रहस्य उमगलं
सुख म्हणजे नक्की काय असतं हे समजलं
सुख म्हणजे मनाचे समाधान
मानलं तर सुख नाहीतर सदा दुःखी..